आग्रहाचे अवाहन..... स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद,राष्ट्र उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार माझ्या आयुष्याला बालपणापासून मिळत गेली.शालेय जीवनात पुरोगामी विध्यार्थी संघटना आणि शे.का.पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन चळवळीत सक्रीय राहिलो.१९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली.या निवडणुकीला विध्यार्थी-युवकांनी उठावाचे स्वरूप आणले.मोठ्या विश्वासाने साथ दिली.तो विश्वास सार्थ ठरावा म्हणून प्रत्येक अडचणीत त्यांच्याबरोबर राहिलो.काही प्रश्न निर्णायक लढवले.काही प्रश्नाबाबत धोरण स्वीकारावे लागले.पन्नास वर्षाहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो मात्र १९७७ नंतर डावी पुरोगामी,परिवर्तनवादी चळवळ क्षीण क्षीण होत गेली.त्याची कारणे शोधण्याची गरज जाणवू लागली.चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही.जे काही घडत गेले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील किमान शंभर हून अधिक शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती.या चळवळीचा वृतांत लोकांपुढे सादर करावा.काय चुकलं ते शोधावं.या उद्धेशाने हा प्रवास प्रकाशित करत आहे. पुस्तकाचे प्रकाशन करताना आज चळवळीतील सर्वांची आठवण ये...