--////--पाणी रे पाणी तेरा रंग कैसा--////-- पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या आटपाडी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी टेम्भूच पाणी आलं.पिढ्यान पिढ्या पिचलेल्या लोकांच्या आनंदाला आणि उत्साहाला त्यामुळे उधाण आलं.जगण्याच्या नव्या लढाईला तोंड फुटलं.शेकडो वर्षे भुकेनं पेटलेले लोक आधाशासारखी पाण्यावर तुटून पडली.जिवाच्या आकांतान पाण्याची पळवापळवी चालू झाली.या धामधुमीत हि लढाई दूर डोंगर उतारावरून केवळ पहात बसण्याशिवाय पर्याय नसलेल्या माणसाच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसलच नाही.एका कर्मयोग्याच्या मनाला मात्र ते ढसल.पाणी उचलून नेण्याची ऐपत नाही.नशिबानं कॅनॉलजवळ शेती नाही.पाझरान आपसुख लाभ मिळायची शक्यता नाही.अशा हतबल,हताश लोकांना मग संपतराव दादांनी गोळा केलं.हात उगारण्यासाठी नसतात,हात मागण्यासाठी नसतात, हात निर्मितीसाठी असतात या मंत्राने त्यांच्यातला आशावाद चेतवला.आणि डोंगराच्या पायथ्याला या तिसऱ्या जगातही सुरु झाली एक अनोखी,अदभूत लढाई... डोंगराच्या उताराला आता वर्दळ दिसु लागली.युद्धासाठी लागना-या सामानाची जुळवाजुळवी सुरु झाली होती.दादांनी दारोदारी हिंडून कुठंन कुठंन डाळिंबाची रोपे,पाईपा, पाण्याच्या टा...
पोस्ट्स
डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत शाहू महाराज ,ले.जनरल पंनू, ब्रिगेडियर प्रवीण पाटील,पुणे महानगरपालिका आयुक्त दळवी साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत आज कराड येथे भाई संपतराव पवार यांना 'जीवन यशवंत गौरव' पुरस्कराने सन्मानित करण्याचे आले..... कारगिल विजय दिवस समारोह समितीचे लक्ष लक्ष आभार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्रांतिवीर नागनाथ अण्णा,मा.शरदचंद्रजी पवार आणि आता भाई संपतराव पवार... स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या 'जीवन गौरव यशवंत' पुरस्काराने भाई संपतराव पवार यांचा सन्मान कारगिल विजय दिवस समारोह समिती(कराड)यांचे मनःपूर्वक आभार.. दि.15 डिसेंबर 2017 कृपावंत आम्ही...... अँड.संदेश पवार उगम फौंडेशन, क्रांतिस्मृतिवंन,बलवडी