मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

'चारा छावणी उच्चाटन परियोजना'

महाराष्ट्रात दरवर्षी कुठे न कुठे दुष्काळ पडत असतो. प्रत्येक दुष्काळात चाराटंचाई वर उपाय म्हणून चारा छावणी उघडली जाते.परंतु चारा छावणी चा उपाय सर्वर्थाने घातक ठरत आहे. म्हणूनच चारा टंचाईच्या काळात चारा छावणी च्या ऐवजी चारा छत्र ही चारा पुरवू शकणारी संकल्पना उगम फौंडेशन बलवडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने राबवण्यात येत आहे.
सम्पूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकणारा दुष्काळ आपत्ती व्यवस्थान प्रकल्प उगम फौंडेशन या संस्थेच्या वतीने साकारण्यात येत आहे.
हा महत्वकांक्षी प्रकल्प 'चारा छावणी उच्चाटन परियोजना' अंतर्गत एकाच वेळी अनेक स्तरावर कार्यरत राहील.
या योजनेचा एक भाग म्हणून उगम फौंडेशन बलवडी या संस्थेच्या वतीने दि. 01022021 रोजी बलवडी येथील ग.नं.135 मधील दहा एकरावर  मका उत्पादन प्रारंभ कार्यक्रम पार पडला.
संभाव्य दुष्काळाला तोंड देण्यासाठी तीनशे टन वैरण साठा तयार ठेवण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे.
दि.01022021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा